मुंबई | खंडाळा घाट येथील नागनाथ ते पळसदरीदरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर (Pune-Mumbai railway) रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबल्या आहेत. दरड हटविण्याचे काम पूर्ण होऊनही अद्याप रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली नाही. रेल्वीही एक तास उशिराने धावत आहे. यामुळे अप लाईनवरील वाहतूक उशीराने सुरु आहे.
दरम्यान, नागनाथ ते पळसदरीदरम्यान दरड कोसळ्याची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. यानंतर दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळवण्यात आली असून अप लाईन रेल्वे वाहतूक पूर्व पदावर होण्यास थोडा उशीर होणार आहे.