HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे सरड्या सारखे रंग बदलतात! – अजित पवार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान लक्ष्य केलस. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही नक्कल करत राज ठाकरेंनी त्यांना चिमटा काढला. राज यांच्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर देत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

“राज ठाकरे या व्यक्तीला टिकेशिवाय आणि नकलांशिवाय काहीच जमले नाही. आपण निवडून आणलेले १३ आमदार आपल्याला का सोडून गेले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. भाषण करुन जनतेचे प्रश्न सुटत नाही किंवा त्यांना रोजीरोटी मिळत नाही. राज ठाकरे हे पलटी मारतात, लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर विधानसभेच्या काळात त्यांनी काय केले हे देखील आपण पाहिले आणि कालच्या सभेत काय केले हे देखील आपण पाहिले”, असे अजित पवार म्हणाले.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर त्यांनी जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना अजित पवारांनी राज ठाकरेंना त्यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीची आठवण करुन देत, एकेकाळी त्यांनी पवारांचे कौतुक केले होते. आता त्यांना ते जातीयवादी वाटायला लागले आहेत असं म्हटलं. राज ठाकरे सध्या सरड्यासारखे रंग बदलत असल्याची टीकाही अजित पवारांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

News Desk

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

News Desk

हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलूनच दाखवा! – इम्तियाज जलील

News Desk