HW News Marathi
महाराष्ट्र

बाबासाहेबांना जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो – राज ठाकरे

पुणे | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज (२९ जुलै) वयाची शंभरी गाठली आहे. पण, त्यांच्यात काहीच फरक पडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तेज तसंच आहे. वयामुळे शरीर थोडसं थकलंय. पण त्यांचं बोलणं, स्मरणशक्ती आणि संदर्भ देण्याची हातोटी यात काहीही फरक पडलेला नाही, असं सांगतानाच बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो, असं गौरवोद्गार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी वयाची शंभरी गाठली आहे. राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गौरवोद्गार काढले. बाबासाहेबांच्या त्यांच्या लिखाणातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही. इतिहासाच्या पानात जे सापडलं आणि जे खरं आहे. ते त्यांनी लोकांसमोर मांडलं. एखादी दंतकथा असेल तर ते तसं सांगतात. या कथेला आधार नाही हे ते सांगतात.

ते इतिहासातील नवीन साक्षात्कार घडवत असतात

या घोरपडीचं उदाहरण त्यांच्या पुस्तकात कधीच नसते, असं सांगतानाच आज एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेतून ते एखादा ऐतिहासिक संदर्भ सांगत असतात. पण ते सांगत असताना ते आजच्या घटनेशी याचा संबंध आहे, असं सांगत नाहीत. ते तुम्ही समजून घ्यायचं असतं किंवा जाणून घ्यायचं असतं. जाणून घेणं हे आपलं काम आहे. सांगणं हे त्यांचं काम आहे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा गाठीभेटी होतात, तेव्हा ते इतिहासातील नवीन साक्षात्कार घडवत असतात, असं राज म्हणाले.

समाजानं कसं वागलं पाहिजे, हे शिकवतात

शिवचरित्रं अनेकांनी लिहिली. पण त्या शिवचरित्रातून समाजानं कसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सावध असलं पाहिजे, या गोष्टी बाबासाहेबांकडून ऐकायला मिळायला त्या विलक्षण आहेत. आजच्या जगात महाराज आपल्याला काय सांगतात हे बाबासाहेब आपल्याला सतत सांगत असतात. तिच नवीन गोष्ट आणि अनोखी गोष्ट मला बाबासाहेबांमध्ये दिसून आली, असं ते म्हणाले.

आनंदी आहे, पण समाधानी नाही

परवा त्यांना भेटलो. ते म्हणाले, आनंदी आहे. पण समाधानी नाही. ते खरंच आहे. ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटलो, त्या त्यावेळी नवीन खजाना भेटल्याचं मला प्रत्येकवेळी वाटलं. आपल्या छत्रपतींबद्दल अजून नवीन माहिती, इतिहासाबद्दल आणखी काही नवं बाबासाहेबांकडून आपल्याला ऐकायला मिळालं. मी लहानपणापासून त्यांची अनेक व्याख्याने ऐकली आहेत. शिवछत्रपतींचं चरित्रं अनेकदा वाचून झालं आहे.

मी ज्या ज्यावेळी त्यांचं व्याख्यान ऐकली, आजही ऐकतो तेव्हा मला प्रत्येक वेळा वाटतं ते नुसतं शिवचरित्रं सांगत नाहीत. 2021मध्ये आपण कसं जगलं पाहिजे. कसं सावध असलं पाहिजे, म्हणजे या देशातील हिंदूंनी मराठी समाजाने किती सावध असलं पाहिजे, किती सतर्क असलं पाहिजे हे या इतिहासातून मला वाटतं बाबासाहेब सतत सांगण्याचा प्रयत्न सर्वांना करत आले. त्यातून तो बोध घेणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावे – रोहित पवार  

News Desk

काकडे म्हणतात ठाकरेंची सरकारमध्ये घुसमट होतेय, अजित पवार म्हणतात, बोलणाऱ्याची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा

News Desk

“लोकप्रतिनिधींना रस्त्यातच अडवा”, उदयनराजेंची मराठा बांधवांना चिथावणी!

News Desk