HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे, राणेंना पक्षातून का बाहेर जाव लागल? CM पदावरून उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा सवाल

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये बोलताना स्पष्ट केले की, मी मुख्यमंत्री पद स्विकारल ते एका जबाबदारीने स्विकारले. केवळ आण केवळ मी माझ्या पित्याला दिलेल वचन म्हणून हे पद स्विकारलं. शिवसेना प्रमुखांना दिलेल वचन अजुन पूर्ण झालेल नाही. मी त्यांना सांगितल आहे की, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवेन, आणि तो मी दाखवेनच. शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित मी राजकारणातून बाजुला झालो असतो, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. पण उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पदाच्या उद्धव ठाकरेंच्या महत्वकांशेबाबत फडणवीसांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राणे आणि राज ठाकरेंना पक्ष का सोडावा लागला असाही सवाल फडणवीसांनी केला आहे.

तुम्ही आम्हाला दोष देणे थांबवा आता तुम्ही दोन वर्षे मुख्यमंत्री आहात

मुख्यमंत्र्यांनी त्यांचा भाबडेपणाचा मुखवटा आता उतरवला पाहिजे आणि मान्य केले पाहिजे की, मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वकांशा होती आणि ती त्यांनी पुर्ण केली. राजकारणात महत्वकांशा असणे चुकीचे नाही, पण त्यामागे तत्वज्ञान उभे करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांना दिलेला शब्दच पुर्ण करायचा होता, तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आल असत. मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे होते तर त्यांनी पक्षातील दिवाकर रावते, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करता आले असते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायच नव्हत, तर राणेंना पक्षातून का बाहेर जाव लागल ? राणेंना पक्षप्रमुख व्हायच नव्हत. राज ठाकरेंना पक्षातून का बाहेर जाव लागल ? तुमची मुख्यमंत्री पदाची महत्वकांशा होती, त्यामुळे तुम्ही आम्हाला दोष देणे थांबवा. आता तुम्ही दोन वर्षे मुख्यमंत्री आहात. आता तेच तेच सांगून तुम्ही किती वर्षे काढणार आहात ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या दसरा मोळा भाषणानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हिंदुत्व म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली होती ज्यांना अजूनही वाटंत मुख्यमंत्री आहे

उद्धव ठाकरेंनी भाजपवर युतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री पदावरून दसरा मेळाव्यात टीका केली होती. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, हिंदुत्व म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. ज्यांना अजूनही वाटंत मुख्यमंत्री आहे, राहिला असतात, पण जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर. आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला असता, पण तुमच्या नशीबात नव्हतं. आणि तुम्ही वचन मोडलंत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझ्यावर सध्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी खांद्यावर आहे. ती जबाबदारी पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या एका निश्चयाने मी उभा राहिलो आहे. माझ्यावर टीका होतेय, होय हे माझं क्षेत्र नाही, मी पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी आलो आणि क्षेत्रात ठामपणे पाय रोवून उभा राहिलो आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणून मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधणं योग्य

News Desk

‘पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन’, नाना पटोलेंची माहिती…!

News Desk

मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा!

News Desk