HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री नाही म्हणाले नाहीत’, लोकल प्रवासासंदर्भात टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | मुंबईत काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. रेल्वेने प्रसवास करण्यास अजूनही बंदी आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून असलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांची निराशा झाली आहे. दरम्यान, लोकलमधून प्रवास करण्यास तूर्तास परवानगी का देण्यात आली नाही, याचं स्पष्टीकरण देत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पण होणारे परिणामही मुख्यमंत्र्यांनाच बघावे लागतात

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी असं प्रस्ताव मुख्यमंत्रयांकडे मांडला गेला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले,”लोकल रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलेलं नाही. त्यांनी हा निर्णय तूर्तास स्थगित केलेला आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीनं मागणी होत आहे. मागण्या होत आहेत, पण होणारे परिणामही मुख्यमंत्र्यांनाच बघावे लागतात”, असंही टोपे म्हणाले आहेत.

“दोन डोस घेतलेल्यांचं प्रमाणपत्र तपासून प्रवेश देणं. मोठ्या संख्येनं लोक लोकल रेल्वेतून प्रवास करतात, मग हे शक्य होईल का? ते कशापद्धतीने तपासता येईल? या सगळ्या बाबी आहेत. यात घाईगडबड करणं शक्य नसतं. घाईत असं केलं गेलं, तर करोनाच्या दृष्टिकोनातून याचे दुष्परिणाम खूप मोठे होऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलेलं नाही. निर्णय स्थगित केलेला आहे. संबंधित सर्व लोकांशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतीलच”, असं टोपे यांनी सांगितलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोमकावळ्यांची पिसं झडून जातील, चोची तुटून जातील!; राऊतांचा विरोधकांवर निशाणा

News Desk

सर्व समुदायासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार! – अजित पवार

Aprna

“आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार”, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Aprna