HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार!

मुंबई | देशात, महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार आता येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट केंद्र सरकारला साकडं घातलं आहे. आज (२२ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या पाया पडायला देखील तयार!

“राज्य सराकर सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत”, असं देखील ते म्हणाले आहेत. तसेच, जिथून लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देतां येईल तिथून करुन देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने लसींचा साठा मिळवण्यासाठी आगाऊ नोंदणी केली

यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही सिरम इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला तेव्हा अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारने २४मे पर्यंतच्या लसींचा साठा मिळवण्यासाठी आगाऊ नोंदणी करुन ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी किमान महिनाभर तरी सिरम इन्स्टिट्यूटकडून लसी उपलब्ध होण्याची शक्यता नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

उध्दव ठाकरेंची ‘भारत बायोटेक’कडून कोव्हॅक्सीन लस मिळवण्यासाठी बोलणी सुरू

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी ‘भारत बायोटेक’कडून कोव्हॅक्सीन लस मिळवण्यासाठी बोलणी करत आहेत. मात्र, भारत बायोटेकने अद्याप राज्यांना कोणत्या किंमतीने लस विकायची हे निश्चित केलेले नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय झाल्यानंतरच महाराष्ट्राला भारत बायोटेकडूनकडून लसी विकत घेता येतील, असेही टोपे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी; शौचालयाच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी शासन सर्व प्रकारची मदत करेल! – मुख्यमंत्री

Aprna

महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात! – यशोमती ठाकूर

Aprna

वैद्यकीय क्षेत्रातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा  

News Desk