HW News Marathi
महाराष्ट्र

दीपिकाच्या चेहऱ्यावरच फोकस करुन बळीराजाचा रोष दाबण्यासाठीचा हा खटाटोप राजू शेट्टी कडाडले

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला २५ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावण्यावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. याच दिवशी देशभरातील शेतकरी केंद्राच्या नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. मात्र, त्यांचा तो सरकारविरोधी रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला त्या दिवशी चौकशीला बोलावल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

राजू शेट्टी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, “दिपीका पदुकोणला NCB ने २५ सप्टेंबरलाच चौकशीसाठी बोलावले आहे. कारण याच दिवशी देशभरातील शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. माध्यमांनी आंदोलन करणाऱ्या करपलेल्या चेहऱ्यांच्या शेतकऱ्यांना दाखवण्याऐवजी दीपिकाच्या चेहऱ्यावरच फोकस करुन बळीराजाचा रोष दाबण्यासाठीचा हा खटाटोप आहे.”

 

दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही आज (२५ सप्टेंबरला) चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र, दीपिकाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण २६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे सांगितले आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण काल (२४ सप्टेंबर) मुंबईत दाखल झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेंद्र मोदीनींच अब्दुल कलमांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटलांचा अजब दावा

News Desk

“संजय राठोड आमचे दुश्मन नाही आणि शिवसेना तर …”,चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

News Desk

शिवाजी महाराजांच्या घोषणांवर कुणीही विनाकारण राजकारण करणं योग्य नाही

News Desk