HW News Marathi
महाराष्ट्र

पालघरमध्ये राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर अडवला

मुंबई | राज्यभरात सोमवारपासून दूध उत्पादकांना अनुदान देण्याच्या मागणीवरून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सर्वच दूध उत्पादक क्षेत्राची कोंडी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत.

आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे. ‘कालपासून मुंबईत दुधाचा एकही टँकर येऊ दिला नाही’, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. तर आज गुजरातमधून महाराष्ट्रात दुधाचे टँकर येऊ नये म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालघरमध्ये आंदोलन केले आहे.

या आंदोलनात कार्यकर्त्यांसोबत स्वत: खासदार राजू शेट्टी देखील सहभागी झाले. आज गुजरातहून मुंबईत येणारा पहिला दुधाचा टँकर त्यांनी परत पाठवला आहे. गोकुळ संघाचा हा दुधाचा टँकर होता. त्यामुळे हे आंदोलन असेच सुरू राहिल्यास उद्या मुंबईमध्ये दूध पुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी संवाद

News Desk

अखेर बीड अ‍ॅसिड हल्ला प्रकारणातील आरोपीला अटक

Gauri Tilekar

कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी!

News Desk