HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive: केवळ शक्ती प्रदर्शनासाठी तुम्हाला घटकपक्षांची गरज लागते !

बारामती | “घटकपक्षांचा अपमान करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिला,” असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना विचारला आहे. “जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ केली. तेव्हा शक्ती प्रदर्शनासाठी तुम्हाला घटकपक्षांची गरज लागते. वेळप्रसंगी तुम्ही हेलिकॉप्टर पाठविण्यास देखील तुम्ही तयार होता, असे म्हणत राजू शेट्टींनी महाविकासआघाडीच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. मात्र, सर्व सुरळीत झाल्यानंतर जाणीवपूर्वक अनुलेखाने मारणे हे बरोबर नाही, अशा पद्धतीने निमंत्रण नाकारणे, नेत्यांचा अपमान करणे हे बरोबर नाही, ही आमची भूमिका असल्याचे राजू शेट्टींने एच. डब्ल्यु. मराठीची बोलताना स्पष्ट केले आहे.

“महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला. तिन्ही मोठे पक्ष एकत्र आल्यानंतर आमच्या वाटेला काही येणार नव्हते, हे आम्हाला आधीच माहिती होते. तसेच शेकप, समाजवादी, स्वाभिमानी आम्ही तिन्ही पक्ष पारंपारिक चळवळीतून आलेले विरोधी पक्ष आहेत. आम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा देखील केली नाही. तरी देखील आम्हा तिन्ही पक्षांना मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याचे निमंत्रण दिले जात नाही. ही जाणीवपूर्वक वागणूक आम्हाला दिली गेली, याबाबत आम्ही नाराज असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना मांडली आहे.

महाविकासआघाडीला सातबारा हा कोरा करावाच लागेल | राजू शेट्टी

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रचारसभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. यावर शेट्टी म्हणाले की, “अजित पवार तर सांगितले होते की, साताबारा कोरा नाही केला, तर पवारांचे नाव सांगणार नाही. आता त्यांचेकडे अर्थ खाते आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मुळापासून सुटत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही, कर्जमाफी हा काय कायमचा उपाय नाही. कर्जमाफी मुळे थोडाफार दिलासा मिळू शकतो. पण, मुळ दुखने म्हणजे शेतकऱ्यांला शेतीचे उत्पादन घेत असताना खर्चापेक्षा बाजारातून त्यांना उत्पन कमी मिळते. हे शेतकऱ्यांचे मुळ दुखणे, असल्याचे देखील शेट्टींनी एच. डब्ल्यु. मराठीशी बोलताना सांगितले. शेट्टी पुढे म्हणाले की, या दुखण्यावर जोपर्यंत उत्तर सापडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सामना’च्या अग्रलेखातील गलिच्छ भाषेबाबत चंद्रकांत पाटील रश्मी वहिनींना पत्र लिहिणार

News Desk

अनिल परबांचा राजीनामा का नाही?, नितेश राणेंचा सवाल!

News Desk

महाविकासआघाडी सरकार माझ्यावर पाळत ठेवतयं, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप!

News Desk