HW News Marathi
महाराष्ट्र

“गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असं करायला नको होतं”…रक्षा खडसेंचा पलटवार 

जळगाव । भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केल्यामुळे काल (२८ जानेवारी) राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले होते. दरम्यान, ही चुक झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ या गोष्टीची दखल भाजपला घेण्यास सांगितली होती.

‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजप आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा सायबर पुढील कारवाई करेल’, असे ट्विट करत गृहमंत्र्यांनी भाजपला ठणकावले होते. काही वेळानंतर ती चुक वेबसाईटवर दुरुस्तही करण्यात आली होती.

मात्र, आता रक्षा खडसे यांनी अनिल देशमुखांवरच पलटवार केला आहे. “राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली ही चांगली बाब आहे पण मला वाईट या गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती पोस्ट शेअर करायला नको होती. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात तुमची जबाबदारी आहे की प्रत्येकाला रक्षण मिळालं पाहिजे. पण एक गोष्ट खटकली की ज्या पोस्टमध्ये अपशब्द लिहिले होते ते त्यांनी ट्विट करायला नको होते”, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

पुढे त्या असंही म्हणाल्या की, “जेव्हा राजकारणात तुम्ही उतरतात तेव्हा चांगल्या गोष्टी पण घडतात आणि वाईट गोष्टीही घडतात. त्या गोष्टीला मोठं करण्यासारखं काही नाही. जे घडलं त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनीही याची दखल घेतली आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे”, अशी मागणीही यावेळी रक्षा खडसे यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री जयंत पाटील यांना अश्रु अनावर…सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात झाले भावूक

News Desk

‘दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’ चंद्रकांत पाटलांचा मुश्रीफांना सवाल!

News Desk

“देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं”, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप   

News Desk