HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली, सरकारने देशाची माफी मागावी – राम कदम  

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने आज (११ नोव्हेंबर) रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर भाजपकडून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे तर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. भाजप नेते राम कदम यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला टोमणा मारला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात मारलेली सणसणीत चपराक ! सर्वोच्च न्याय पालिकेचा निर्णय. महाविकास आघाडी सरकारने देशाची माफी मागावी, असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

 

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यापासून राम कदम यांनी त्यांना पाठींबा दिला होता. काम कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. तर पायी चालत सिद्धीविनायकपर्यंतही ते गेले होते. इतकेच नव्हे तर मंत्रालयाच्या बाहेर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलनही केले होते. मात्र, अखेर अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर झाल्याने भाजपकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील मनसेच्या शिलेदारांना राज ठाकरे कानमंत्र देणार

News Desk

पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, सामानातून जोरदार टीका

News Desk

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत! – आरोग्यमंत्री  

Aprna