HW News Marathi
महाराष्ट्र

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, मागासांना आरक्षणाचा सर्वाधिक लाभ द्या, आठवलेंची मागणी

मुंबई | आरक्षण हा मुद्दा आता वेगळ्याच वळणावर गेला आहे. भाजप मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे. यातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.रविवारी जागतिक लोकसंख्या दिवस होता. त्यानिमित्ताने रामदास आठवले यांनी ही मागणी केली. जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे, असं आठवले म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले पात्र

जागतिक लोकसंख्या दिवसानिम्मित बोलताना रामदास आठवले यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली असून जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळेल, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहोचण्यास मदतच मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, असं सांगतानाच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. मात्र, सामाजिक न्यायासाठी ही मर्यादा ओलांडली पाहिजे, असंही ते म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रित करायला हवं

योगी आदित्यनाथ यांनी काल (११ जुलै) लोकसंख्या नियंत्रणाविषयी नवीन प्लॅन लोकां पुढे सादर केला आहे.काही राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदा बनविण्यावर भर दिला जात छआहे. उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये नव्या लोकसंख्या धोरणावर जोर देण्यात आला आहे. दोन्ही राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन पेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांना सरकारी योजनांपासून दूर ठेवण्यावरही भर दिला जात आहे. मात्र, सध्या हा निव्वळ चर्चेचा विषय असला तरी त्यातच आठवले यांच्या विधानाने भर टाकली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंना मुख्यमंत्री-पंतप्रधान व्हावे वाटेल, नियुक्तींचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच | महाजन

swarit

“अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”, भाजप पक्षाकडून ठाकरे सरकारवर हल्ला

News Desk

नवाब मलिकांच्या ED कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

Aprna