HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांसह रामदास कदम राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालासोबतची भेट महत्तवाची मानली जाते. सत्तास्थापनेच्या बोलविण्याची शिवसेना विनंती करणार ? , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राऊतांनी आज (४ नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषदे घेऊन राज्यभालांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे सांगितले होते. राऊत पुढे म्हणाले की,मी उद्धव ठाकरेंशी बोललो आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच, नेमके कोणत्या मुद्यावर राज्यपाल आणि राऊत यांच्या चर्चा होणार याकडे राज्याचे लक्ष लागेल आहे.

राऊत पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणाले

राज्यभालांसोबतची भेट राजकीय नसून ही भेट सदिच्छा आहे. कोश्यारी हे अनुभवी नेते आहे. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे. आम्हीही त्यांच्यासोबत काम केले आहे. निवडणूक झाली, निकाल आला, यादरम्यान त्यांची भेट होऊ शकली नाही. मी उद्धव ठाकरेंशी बोललो आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच,” असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार

News Desk

राऊत- फडणवीस यांच्या भेटीला राजकीय अर्थ नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया

News Desk

ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर, स्वगृही परतण्याचा मार्ग खुला !

News Desk