HW News Marathi
महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला इशारा -“पुढच्या ८ दिवसात शेतकऱ्यांना मदत न केल्यास…”

परभणी | गेल्या 15 दिवसात जवळपास 4 वेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली, वाण नदी सारख्या नदी काठच्या गावांचे यामुळे शेतीसह, घरे, पशु असे प्रचंड नुकसान झाले. मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला असून सर्वत्र पिकांची मोठी हानी झाली आहे. यावर भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते शेतकऱ्यांचा बांधावरून जात आहेत. मात्र, काँग्रेसचा कोणीही मंत्री नेता, पालकमंत्री अजून शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही. या आघाडी सरकारच्या नेत्यांकडे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ नाही असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणीत केलं आहे.

लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळं देशातील शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर तोफ डागली आहे. ‘भाजप सरकारची ही नेहमीची स्ट्रॅटेजी झाली आहे. हाथरससारखे बलात्कार कांड असो किंवा शेतकऱ्यांवर होणारे हल्ले असो. लोकशाहीत एक नवा पायंडा मोदी सरकारनं पाडलाय. विरोधी पक्षाचे नेते लोकांच्या संतापाला वाचा फोडत असतील तर कायदा सुव्यवस्थेच्या नावावर त्यांचा आवाज दाबण्याचं एक नवं हत्यार सरकारनं शोधून काढलंय. सत्य समोर येऊ दिलं जात नाही. लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळं देशातील शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे. त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला तर संतापाचा स्फोट होऊ शकतो. काय चाललंय हे लोकांना चांगलं कळतंय. उत्तर प्रदेशातील स्थिती भयंकर आहे. प्रियांका गांधींसह अनेक नेत्यांना रोखलं गेलंय. पंतप्रधान मोदी हे आपल्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल बरंच काही बोलत असतात.

सरकारवर शेतकरी नाराज आहे, अशी टीका करत आगामी आठ दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत न दिल्यास भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी दानवेंनी सरकारला दिला आहे. दानवेंनी परभणी जिल्ह्यातील ७ म्हसुल मंडळाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. रात्री उशिरा आनंद भरोसे यांच्या घरी माध्यमांशी बातचीत करतांना त्यांनी थेट मवीआ सरकारला आव्हान दिलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या लढाईत भाजपात असलेल्या उदयनराजे आणि संभाजीराजेंची शिवसेनेने घेतली बाजू …

News Desk

राजू शेट्टींचे आज ‘चलो बारामती’ आंदोलन !

News Desk

“चित्रा ‘वाघ’ची वाघीण का बनली?”, माजी IPSअधिकारी म्हणतात…  

News Desk