HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप कोणतंही राजकारण करत नाही, तुम्हीच राजकारण थांबवा, राबसाहेब दानवेंचा राऊतांवर पलटवार

जालना | केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली दिली असून राज्य सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे. एकदा केंद्राने आणि राज्याने काय केलं याचा हिशेब व्हायला हवा अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. तशी मागणी केल्यास ते राजकारण होईल असेही ते म्हणाले आहेत.

राज्य सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत असुन राज्य सरकारनं मधल्या काळात कोरोना रुग्णवाढीकडे दुर्लक्ष केलं असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

केंद्राने राज्याला मोठ्या प्रमाणात मदत केली असून सर्व राज्यांना समान वागणूक दिली असून एकदा केंद्राने आणि राज्याने काय केलं याचा हिशोब व्हायला हवा असं सांगायला देखील दानवे विसरले नाहीत.

राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील हॉस्पिटलमधील दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारने या घटनांतुन बोध घेऊन ऑडिट करावं असं सांगत सध्या राज्यातील प्रत्येक मंत्री वेगवेगळे विधान करून राजकारण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी असंही दानवे यांनी म्हटलंय. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दोन महिने राजकारण थांबवावं असं म्हटलंय यावर बोलताना भाजप कोणतंही राजकारण करत नाही,तुम्ही राजकारण करू नका असंही दानवे म्हणाले.

आज सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर धाडी टाकून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केलाय यासंदर्भात विचारलं असता कायदा कायद्याचे काम करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.या प्रकरणात वाझे यांनी मंत्री अनिल परब यांचंही नाव घेतल्याने त्यांचीही चौकशी होईल असंही दानवे म्हणाले.

रेमडेसिवीर वाटपात जालना जिल्ह्यात राजकारण सुरु आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यास राजकारण होईल.अशी प्रतिक्रिया यावेळी दानवे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती! – जितेंद्र आव्हाड

Aprna

राज ठाकरे यांचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पत्र 

News Desk

संजय राऊतांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं,नाना पटोले आणि राऊतांंचं सूत पुन्हा जुळलं !

News Desk