HW News Marathi
महाराष्ट्र

फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध लावतात, नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका!

मुंबई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सव निर्बंधांमध्ये साजरा करावा लागत आहे. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध लावतात, अशी टीका नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर केली.

माध्यमांशी संवाद साधताना निर्बंधांवर भाष्य केलं

नारायण राणे यांच्या घरी आज गणरायाचं आगमन झालं. यावेळी राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना निर्बंधांवर भाष्य केलं. सत्ताधाऱ्यांनी निर्बंध लावले आहेत. याला जबाबदार हे सत्ताधारी आहेत. हिंदू सोडून कोणत्याही अन्य धर्मांवर त्यांचा सण साजरा करायला प्रतिबंध नाही आहे. फक्त हिंदू धर्माचे सण साजरे करण्यावर निर्बंध या सरकारने घातले आहेत. कोरोना देशात आहे, नुसता महाराष्ट्रात नाही. पण त्यांचा जास्त बाहू हा महाराष्ट्रात केला जातो, असं नारायण राणे म्हणाले.

गणरायाने आतापर्यंत आम्हा राणे कुटुंबियांना सुखी, समृद्धी आणि आनंदी ठेवलेलं आहे

नारायण राणे यांनी गणरायाकडे काय साकडं घातलं या प्रश्नावर उत्तर दिलं. गणरायाकडे काही साकडं घातलेलं नाही. गणरायाने आतापर्यंत आम्हा राणे कुटुंबियांना सुखी, समृद्धी आणि आनंदी ठेवलेलं आहे. मात्र, गणरायाकडे एक मागणं आहे की महाराष्ट्रावर कोणत्याही प्रकराचं संकट येता कामा नये, कोरोनाचं संकट दूरू होऊदेत आणि आमच्या जनतेला सुखी समाधानी ठेवावं अशी प्रार्थना करतो, असं नारायण राणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळाले तर आम्हाला आनंद होईल !

News Desk

नोटबंदी, जीएसटीमुळे शिवसैनिकाची आत्महत्या, शिवसेना केंद्राच्या अविश्वास प्रस्तावाविरोधात जाणार का?

News Desk

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’ चे नवे राजकारण !

News Desk