HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर रिक्षाचालकांचा संप मागे

मुंबई । महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक-मालकांचा आज (९जुलै) होणारा संप अखेर त्यांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर संप मागे घेत असल्याचे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. ओला, उबेर, बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक-मालक आज संपावर जाणार होते.

या संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक सहभागी होणार होते. महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांच्या दालनात स्वतः मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात बैठकीत ऑटोरिक्षा चालक-मालकांच्या मागण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असताना वाहतुकीसाठी रिक्षा मिळणार नसल्याने मुंबईकरांसाठी मोठी डोके दुखी ठरणार होती. कृती समितीबाहेर स्वाभिमान संघटनेने संपाला पाठिंबा दिल्यानंतर राज्य राष्ट्रीय कामगार संघानेही कृती समितीच्या संपाला पाठिंबा जाहीर केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर पाठोपाठ देगलूरमध्ये क्रांती होणार, सदाभाऊ खोतांचा दावा!

News Desk

पुण्यात मनसेची निवडणूक मोर्चेबांधणी, ‘या’ नेत्याकडे दिलीमोठी जबाबदारी

News Desk

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख पत्रकार परिषदेत का रडले? काय आहे नेमके प्रकरण? 

News Desk