HW News Marathi
महाराष्ट्र

औट्रम घाटातील रस्ता खचला, वाहतूक ठप्प

कन्नड औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याला काल पावसाने झोडपून काढले. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पावसाने कहरच केला. पावसामुळे कन्नड (औट्रम) घाटातील रस्ता ठिकठिकाणी खचल्याचे दिसून आले. परिणामी रविवारी रात्रीपासून जळगाव-औऱंगाबाद महामार्गावरील वाहतूकसेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, तेथून खाली खोल दरी असल्याने या मार्गावरून वाहने सोडणे प्रशासनाने थांबविले आहे. दरम्यान कन्नड घाटातील वाहतूक आता नागदमार्गे म्हैसमाळ घाटातून वाहने औरंगाबादकडे जात आहेत. औरंगाबादकडून येणारी वाहने ही नांदगाव व नागद मार्गाने चाळीसगाव शहराकडे वळवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

अर्णब गोस्वामींना सुटका मिळेपर्यंत भाजप काळ्या फीती लावून करणार सरकारचा निषेध – चंद्रकांत पाटील

News Desk

मिशन दापोली साई रिसॉर्ट!, अनिल परबांविरोधात सोमय्या हातोडा घेऊन सज्ज

Manasi Devkar