HW News Marathi
Covid-19

मराठा आरक्षणासाठी मोदींना साकडे घालणार ! रामदास आठवलेंचा निर्धार

मुंबई | मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.त्यावरून विरोधी पक्षाने महाराष्ट्र शासनाला घेरले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजु राज्य सरकार ने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान राखतो मात्र राज्य सरकार च्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे,असे मत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, मराठा समाजाप्रमाणे देश भरातील जाट; राजपूत; रेड्डी आदी क्षत्रिय समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. देशभरातील गरीब क्षत्रियांना ज्यांचे उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 12 टक्के आरक्षण द्यावे अशी माझी मागणी असून त्याबाबत चे विनंती पत्र आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार आहोत.क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे आरक्षण दिल्यास मराठा समाजाला त्यातून आरक्षण मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढविता येत नाही असे मत व्यक्त केले आहे. मात्र ते केवळ न्यायालयाचे मत आहे कायदा नाही तसेच संविधानाचीही तशी गाईडलाईन नाही. त्यामुळे सवर्ण गरिबांसाठी 10 टक्के आरक्षणाचा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला असून आरक्षण आता 59. 50 टक्के झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला 10 ते 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मंजूर व्हायला पाहिजे होता. मराठा समाजात 70 टक्के पेक्षा जास्त संख्येने गरीब आहेत. त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणे गरजेचे आहे. राज्य सरकार ने मराठा समाजाला आवश्यक असणाऱ्या आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली नसल्यानेच मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भारत सरकार मध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. क्षत्रिय मराठा समाजातील गरिबांना आपण आरक्षण मिळवुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार आहोत,असे रामदास आठवले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात १९,१४८ नव्या रुग्णांची भर

News Desk

नितेश राणेंचा दावा खोटा, बीकेसीतील जम्बो रुग्णालयाबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण

News Desk

“मास्क न वापरण्यात काय शौर्य आहे?”, मुख्यमंत्र्यांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

News Desk