HW News Marathi
देश / विदेश

कुणालाही भेटलो नाही, असल्या अफवांनी राजकारण हलत नाही ! संजय राऊतांचं स्पष्टीकरण

मुंबई। शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार काल(३ जुलै) मुंबईत भेटल्याचं उघड झालं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचंही समोर आलं होतं. त्या भेटीला आशिष शेलार यांनी इन्कार केला. आज (४ जुलै) राऊत यांनीही त्याचा इन्कार केला. अफवा पसरवल्या जातात. ज्यांना माझ्यापासून वेदना होतात, यातना होतात असे लोक अफवा पसरवत असतात. महाराष्ट्रात दोन वेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण काय?, असा सवाल करतानाच मी काल दिवसभर कामात होतो. कुणालाही भेटलो नाही. तरीही अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांना भेटल्याच्या चर्चेनंतर आता संजय राऊत यांनी वृत्त पूर्णपणे फेटाळले आहे. “मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील”, असं संजय राऊत यांनी सांगितलं. “मागे एकदा मी आशिष शेलारांना भेटलो होतो. त्यावेळी आम्ही उघडपणे कॉफी प्यायलो होतो, असं सांगतानाच जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ. मजबूतीने एकत्र येऊन. माझ्या लिखानाने कुणाला त्रास झाला असेल आणि त्यातून या अफवा आल्या असतील तर त्याचं मी स्वागत करतो”, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

उद्यापासून अर्थातच (५जुलै) राज्याच पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधकांना महाराष्ट्राची चिंता असेल तर त्यांनी अधिवेशन चालू द्यावं. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आहे. त्यात गोंधळ घालू नये. चर्चा करावी. गोंधळ म्हणजे रणनीती नसते. गोंधळ करून अधिवेशन बंद पाडणं योग्य नाही. गोंधळात अधिवेशन वाहून जाऊ नये, असं सांगतानाच राज्यापुढे अनेक प्रश्न आहे. एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावर चर्चा होऊ शकते. कोरोनावर चर्चा होऊ शकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुनील गायकवाड यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सदनमधील दोन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

News Desk

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दररोज सुनावणी

News Desk

पाकिस्तानने शारीरिक नाही तर माझा मानसिक छळ केला !

News Desk