HW News Marathi
महाराष्ट्र

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”

मुंबई। नुकतच राज्याचं दोन दिवसीय विधिमंडळ पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु असून टीका केली जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाने विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून प्रतिविधानसभा भरवण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक समोरा समोर आल्याचं पहायला मिळालं. मात्र या सगळ्या दरम्यान आमदार रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला त्यादरम्यान त्यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी चक्क सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले होते.

मात्र या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांना राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. रवी राणा यांच्या टीका केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही चांगलाच निशाणा साधला आहे. “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले,” असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं असून रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर मिश्कीलपणे टीका केलीये.

रवी राणा यांनी राजदंड पळवला

महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन काल संपन्न झालं. हे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने गाजवलं. विरोधक असलेल्या भाजपला ठाकरे सरकारने बॅकफूटवर ढकललं. यात मॅन ऑफ द मॅच ठरले ते कोकणातले भास्कर जाधव… भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करून पहिल्या दिवशीच सत्ताधारी विरोधकांवर हावी झाले… दुसऱ्या दिवशीही १२ आमदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय भाजपने घेतला. यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपने प्रति विधानसभा भरवली. या प्रती विधानसभेतही मोठा गोंधळ आणि राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

याच दरम्यान आमदार रवी राणा यांनी विधानसभेत एन्ट्री केली आणि त्यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोरचा राजदंड पळवला. “या राज्यात शेतकऱ्यांचे, कामगारांचे, महिलांचे, ओबीसी आणि मराठा बांधवांचे प्रश्न ऐरणीवर आहेत… त्यावर आपण चर्चा करावी…सत्यासंदर्भातलं माझं निवेदन तात्काळ स्वीकारा…” असं तालिका अध्यक्षांना रवी राणा म्हणाले.. त्यावर तालिका अध्यक्षांनी देखील तितकीच आक्रमक भूमिका घेत, “अध्यक्ष थेट निवेदन स्वीकारत नाहीत… तुमचं निवेदन खाली जमा करा…” असं सांगत विधिमंडळात सर्व घटकांवर चर्चा होत आहे, तुम्ही सहभाग नोंदवा, तुम्हाला पुरेपुर संधी दिली जाईल, पण स्टंट बाजीला येथे कुठला थारा नाही…. तुम्ही जरी राजदंड पळवला तरी कामकाज थांबणार नाही” असं जाधवांनी ठणकावून सांगितलं…!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या महिन्यात ‘या’ तारखेला होणार आरोग्य विभागाच्या परीक्षा – राजेश टोपे

News Desk

भारत बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमंच मुळात नकली, भाजपचा आरोप

News Desk

‘सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा ‘ नाना पटोलेंची उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका

News Desk