HW News Marathi
महाराष्ट्र

“मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट शिजलेल्या बैठकीला सचिन वाझे होते हजर”, NIAने दिली माहिती

मुंबई | ‘मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, त्या बैठकीला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे व माजी पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे हे दोघेही उपस्थित होते. हत्येचा कट रचणाऱ्याशी वाझे यांनी मोबाइलवर संपर्क साधला होता. या हत्येच्या मागे कारण काय होते आणि नेमका कट काय होता, याचा छडा लावण्यासाठी आम्ही तपासात अगदी जवळ पोचलो आहोत,’ असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काल (३० मार्च) मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात केला. त्यानंतर विशेष न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मनसुख हत्या प्रकरणात आरोपी विनायक शिंदे व क्रिकेट बुकी नरेश गोर यांच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली. तर सचिन वाझे यांची एनआयए कोठडी ३ एप्रिलपर्यंत आहे.

अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांची गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या या दोन्ही प्रकरणांचा सध्या एनआयएकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यासह काही अधिकाऱ्यांना अटक केलेली असून, त्यांची चौकशी केली जात आहे. एनआयएने न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित होते, असा दावा एनआयएने केला आहे.

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यामागील हेतू काय होता? या कारणाच्या खूप जवळ पोहोचलो असल्याचं एनआयएने न्यायालयात सांगितलं. यावेळी आरोपी विनायक शिंदे याचा या गुन्ह्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचं शिंदेचे वकील गौतम जैन यांनी न्यायालयात सांगितलं. सीम कार्ड देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे आरोपीला या प्रकरणात जबाबदार ठरवलं गेलेलं नाही, असं जैन म्हणाले. शिदे नऊ दिवसांपासून तपास यंत्रणांच्या कोठडीत असून, आणखी कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तीवादही जैन यांनी केला. दुसरीकडे नरेश गोर यांचा या प्रकरणात फक्त सीमकार्ड पुरवण्यापर्यंतच सहभाग आहे. त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं गोर यांचे वकील अफताब डायमंडवाले यांनी न्यायालयात सांगितलं. न्यायालयाने सुनावणी अंती दोघांच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.

‘तपासादरम्यान तपास पथकाला एक कागद सापडला. त्यात १४ मोबाइल क्रमांक होते. त्यातील पाच क्रमांक हे वाझे यांच्यासाठी होते. त्यातील एकावरून वाझे हे कट रचणाऱ्या मूळ कारस्थान्याशी संपर्क साधत होते. शिंदे व गोर या दोघांकडून सात सिम कार्ड, काही मोबाइल व सीपीयू जप्त केला आहे. या साऱ्यांच्या वापराविषयी दोघांची कसून चौकशी करायची आहे. मनसुख यांच्या हत्येमागील कारण व नेमका कट याच्यापर्यंत तपास पथक पोहोचण्याच्या अगदी जवळ आहे,’ असे गोन्साल्विस यांनी सांगितले. तर ‘सिम कार्ड पुरवण्याव्यतिरिक्त शिंदेचा काहीच संबंध नाही. मनसुख यांच्या हत्येशीही त्यांचा संबंध नाही. त्यामुळे मागील नऊ दिवसांपासून कोठडीत असलेल्या शिंदे यांची कोठडी आणखी वाढवू नये,’ असा युक्तिवाद शिंदेंतर्फे अॅड. गौतम जैन यांनी केला; तर गोरतर्फे अॅड. आफताब डायमंडवाले यांनीही तसाच युक्तिवाद केला. अखेरीस सर्व बाजू तपासल्यानंतर न्यायाधीशांनी दोघांच्या कोठडीत वाढ केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

News Desk

मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चा माफीनामा

News Desk

फाळणीची वेदना कधीही विसरणे शक्य नाही म्हणत पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा!

News Desk