HW News Marathi
महाराष्ट्र

सदाभाऊंचे मंत्रिपद कायम

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतरही राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आलेली नाही. कारण त्यांचे राज्यमंत्रिपद कायम राहणार आहे. खोत हे विधान परिषदेवर भाजपचेच सदस्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात वाद सुरू झाला होता. त्यात खोत यांना भाजपने विधान परिषदेवर पाठविले. तसेच त्यांना राज्यमंत्रीही केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविण्यात शेट्टी यांच्याइतकीच खोत यांचीही मेहनत आहे. परंतु खोत यांच्या चौकशीसाठी शेट्टी यांनी पक्षाच्या नेत्यांची समिती नेमली. खोत यांनी पक्षविरोधी काम केलेले आहे, असा ठपका ठेवून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आहे. संघटनेला एक राज्यमंत्रिपद दिलेले आहे. खोत यांना पक्षातून काढल्यामुळे त्यांनी राज्यमं‌‌त्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता धुसरच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ कारणासाठी शिवेंद्रराजे घेतली शरद पवारांची भेट

News Desk

‘कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच’ – संजय राऊत

News Desk

संजय राऊत यांची आज पत्रकार परिषदेत काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna