HW News Marathi
महाराष्ट्र

पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालेे , सदाभाऊ खोतांची जहरी टीका

मुंबई | सर्वोच न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा धक्कादायक निर्णय दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं.

मात्र हे करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने कोर्टात योग्यरित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतलं नाही, वकिलांना मार्गदर्शन केलं नाही. गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावे जोडले नाही, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी म्हटलं, तुम्ही फार हुशार आहात. तुमचा ‘आदर्श’ घेण्यासारखा आहे. दोन वर्षे अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होते का? सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार पुन्हा गेले. राज्य सरकार का पुन्हा कोर्टात गेले नाही? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नाहीत. अशोक चव्हाण तुम्ही वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत आला आहात. अशोक चव्हाण यांना देण्यात आलेल्या जबाबदारीवरून बाजूला करा. मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्याला उपसमितीचा अध्यक्ष करू नये. या धनदांडग्या नेत्यांना या समितीवर नका ठेऊ, अशा मागणीही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तर मी मुंबई कायमची सोडून जाईन,कंगणाचं गृहमंत्री अनिल देशमुखांना चॅलेंज

News Desk

UP च्या विजयासाठी ओवैसी आणि मायावतींना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा; राऊतांचा भाजपला टोला

Aprna

पाच वर्षांच्या बालिकेचा ‘कळसुबाई’वर झेंडा

News Desk