HW News Marathi
महाराष्ट्र

शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते, तर प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का एकत्र होऊ शकत नाही?

पुणे | मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. अशात खासदार संभाजीराजे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. मराठा समाजातील लोकांच्या अडचणी जाणून घेत आहेत. तसेच, तज्ञांशी बातचीत करत मराठा आरक्षण कसे परत मिळवता येईल याबाबत चर्चा करत आहेत. इतकंच नाही तर, सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी भेटत घेत काही पर्यायी सूचवत आहेत.

गेले काही दिवस संभाजीराजे अनेक नेत्यांना भेटत आहेत. आज (२९ ) त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट घेतली. या आधी संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती.दरम्यान, काल (२८ मे) मुंबईत संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती

…तर प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का एकत्र होऊ शकत नाही?

आज प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेटून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे आणि त्यांच्या चर्चा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की, शरद पवार यांची मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट नाही आहे. तसेच, संभाजीराजेंसोबत मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी आहोत असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. चर्चा झाल्यानंतरच त्यांनी पत्रकार परिषद घेत याबबात माहिती दिली. संभाजीराजे पत्रकार परिषदेत म्हणाले की ,शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते, तर प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का एकत्र होऊ शकत नाही?

खासदार संभाजी छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी संभाजी छत्रपती यांना बहुजन समाजाचं नेतृत्व करण्याचं आवाहनच केलं. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संविधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं, दुसरं म्हणजे ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल, असं आंबेडकर म्हणाले.

दिल्लीत गोलमेज परिषद घेणार

राजधानी दिल्लीमध्ये मराठा समाजाची पहिली गोलमेज परिषगद होणार, अशी घोषणा यावेळी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली. “दिल्लीला मराठा समाजाची गोलमेज परिषद होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व आमदार-खासदारांना, मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षनेत्यांना मी स्वत: आमंत्रण देणार आहे. ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये. मराठा समाजाला तुच्छ लेखू नका. आता वेळी आलीये कृती करण्याची”, असं ते म्हणाले.

तसेच, “त्यासोबत किमान दोन दिवसांचं मराठा समाजावर अधिवेशन व्हायला हवं. अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप करायचे नसून समाजाच्या भल्यासाठी काम करा. आम्ही वर गॅलरीत बसून त्यावर लक्ष ठेऊ. नाहीतर सांगून टाका की या माराठा समाजाचं आम्हाला मतदानच नको आहे. धाडस असेल तर सांगून बघा असं. मग बघतो आम्ही काय करायचं ते”, असं देखील आव्हान संभाजीराजे भोसले यांनी दिलं.

संभाजीराजे यांच्या मुंबईतील कालच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

* मी खासदार झाल्यापासून जी कामे कधीही झाली नाहीत ती कामे केली

* पवारसाहेब म्हणाले की त्यांनाही हे मुद्दे पटलेले आहेत. सर्वपक्षीय बैठकीत पवारांनीही यावे हे माझे आमंत्रण

* दोन्ही सरकारांमुळे समाजाचे नुकसान.

* माझा कोण वापर करून घेणार ? मी छत्रपतींच्या घरात जन्मलोय (प्रश्न : शिवसेना तुमचा वापर करून घेतेय का? )

* राणेंचे ठिके ते माजी मुख्यमंत्री आहेत. मी त्यांनाही भेटणार होते पण शक्य झाले नाही

* मराठा समाजासाठीविशेष समिती स्थापन करा ना, आमच्यासारख्या लोकांना घ्या ना

* ओबीसीप्रमाणे मराठ्यांनाही शैक्षणिक सवलती द्या ना

* 6 जून शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. 6 जूनपर्यंत निकाल लागला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरूनच जाहीर होणार.

* शिवाजी महाराज इथे असले असते तर त्यांनी आपल्या मावळ्यांना असे टाकले असते का ?

* 6 जूनपर्यंत तुम्ही भूमिका घेतली नाही तर त्यानंतर कोविडवैगरे काही मागेपुढे बघणार नाही. आम्ही सगळे जण असू. आम्हाला वेठीस धरू

* सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला,आम्ही दुःखी झालो पण मी सामोपचाराची भूमिका घेतली. कोरोना काळात उद्रेकनको अशी ईच्छा होती.

* माझी भूमिका मवाळ का?असा प्रश्न अनेकांना पडला होता

* सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आम्हाला ह्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही.

* मराठा समाजाला वेठीस धरू नका.

* नाशिकमध्ये म्हणून मी समाजासाठी आक्रमक झालो, अस्वस्थ झालो

* समाजातील लोक अत्यंत दुःखी. कायदाही हातात घेतील अशी मानसिक स्थिती आहे.

* पण माझ्यामुळे समाज शांत आहे.

* आम्ही यापुढे हे सगळे चालू देणार नाही. सहन करणार नाही.

* अनेकांची ईच्छा आपण OBC मध्ये जावे. प्रत्येकाला विचार मांडायचे स्वातंत्र्य

* OBC मध्ये नवा प्रवर्ग तयार करून देता येऊ शंकतो का हे मी नाही उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस, अशोक चव्हाणांनी सांगायचं

* मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही ( उपरोधिक)

*बाबासाहेब आंबेडकरांचीही ईच्छा होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं

* 1967 मध्ये ओबीसीमध्ये आपल्याला आरक्षण मिळत होते.

* मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले, आज सरकार तुमचे. तुमच्या हातात हे आहे ते तुम्ही करू शकता नाही.

* 1 . 9 सप्टेंबर 2020 च्या आधी निकाल लागलेत त्यांना रुजू करून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय

* 2. सारथीची काय अवस्था करून टाकली ? सारथीला जर योग्य ती मदत केलीत तर आरक्षणापेक्षाही कैक पटीने उपयोगी पडेल**

* सारथीत समाजाची लोकं घ्या ना. सारथीला 2 वर्षांत कमीत कमी 1000 कोटी रुपये द्यायला हवे. आम्ही नियोजन करतो ना

* नीट करा नाहीतर बंदच करून टाका. शाहू महाराजांच्या नावाने चालवू नका मला अध्यक्ष बोलवू नका

* आण्णासाहेब पाटील महामंडळला 10 लाख काय ? 25 लाख द्या

* दर जिल्ह्याला वसतिगृह द्या ना. सोलापूरला वसतिगृह दिलंय पण सुरूच नाही केलं.

काय आहेत ३ पर्याय?

* पहिला पर्याय : Review Petition फाईल करा, फुल प्रूफ प्लॅन करून हे Petition करू शकता

* दुसरा पर्याय : Review Petition टिकली नाही तर Curative Petition फाईल करा

* तिसरा पर्याय 342 A मार्फत आपल्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचवू शकता.या माध्यमातुन आपलं प्रपोजल राज्यपालांसमोर मांडवं लागेल त्यांनतर केंद्रापुढे मांडावं लागेल. गायकवाड अहवालातील त्रुटी दूर कराव्या आणि मग तो अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठवावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेकडून अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट भेट!

News Desk

आज सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी साधणार संवाद!

News Desk

जयंत पाटलांची ‘ती’ इच्छा पूर्ण होणं कठीण, शरद पवारांचं कुटुंब खूप मोठं !, मुनगंटीवारांचा टोला

News Desk