HW News Marathi
देश / विदेश

“पश्चिम बंगालच्या निवडणूकीवर देशाच्या राजकारणाची वाटचाल अवलंबून”, राऊतांचे सूचक भाष्य

मुंबई | पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (१ एप्रिल) भाष्य केले आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर देशाच्या आगामी राजकारणाची वाटचाल अवलंबून आहे. यानंतर देशात विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या स्थापन होतील, असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वर्तविले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण ममता बॅनर्जी ही एकटी वाघीण त्यांना पुरुन उरत आहेत. ही लढाई अटीतटीची आहे. पण या लढाईत ममता बॅनर्जी बाजी मारतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. महाभारताचे युद्ध २१ दिवसांत संपले पण कोरोनाचा १८ दिवसांत अंत होईल, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. पण आज वर्ष उलटून गेल्यानंतरही कोरोना कायम आहे. त्यामुळे मोदी सरकारला कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकता आलेले नाही. कोरोनाला हरवता न आलेले मोदी सरकार आता पश्चिम बंगामध्ये ममतांच्या पराभवासाठी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये नवं महाभारत घडत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तसेच पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. देशातील लोकशाहीवर आजपर्यंत नेहमीच आघात झाले. प्रत्येकवेळी लोक त्याविरुद्ध लढले. त्यामुळेच आज देशातील लोकशाही जिवंत आहे, असेही राऊत यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये ३० मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये नंदीग्राम मतदारसंघाचाही समावेश आहे. या एका मतदारसंघात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या २२ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बुथवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही !

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला

News Desk

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर!

News Desk