HW News Marathi
महाराष्ट्र

‘संज्या मार खायच्या लायकीचा आहे, पण त्याचं संरक्षण वाढवलं’, निलेश राणेंची जबर टीका!

मुंबई। ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजित यादव या फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता यावरूनच भाजपचे निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि ठाकरे सरकारवर सुरक्षावरून जहरी शब्दांत टीका केली आहे.

पण संज्या जो मार खायच्या लायकीचा आहे

‘अनधिकृत फेरीवाले हटवायला गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण होते. त्यांची बोटं छाटली जातात. पण अधिकाऱ्यांच्या संरक्षणाचं ठाकरे सरकारला काडीमात्र घेणंदेणं नाही. पण संज्या जो मार खायच्या लायकीचा आहे त्याचं संरक्षण वाढवलं जातं. शिवसेनेच्या खास लोकांनाच सत्तेचा फायदा होतो आहे. मात्र सामान्य शिवसैनिक फटके खातो आहे.’ अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान या घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच भाजपच्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यातच आता निलेश राणे यांनी यावरून संजय राऊत यांच्यावरही बाण नेमला आहे. संजय राऊत यांना राणे प्रकरणानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावरूनच निलेश राणेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ तर नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा!

News Desk

अर्ध्या तासात शरद पवारांनी उभारला कोटींचा निधी

News Desk

केंद्राने वेळीच पावलं उचलली असती तर वीजनिर्मितीवर प्रश्नचिन्ह नसतं, शिवसेनेची टीका!

News Desk