HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधकांनी एकत्र येऊन मोदींविरोधात मजबूत संघटन निर्माण करण्याची गरज आहे – संजय राऊत 

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून राहूल गांधींवर भाष्य केले आहे. यावर आज पत्रकारांशी संवाद साधला आहे. देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, गैर भाजपाशासित राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. त्यामुळे भाजपच्या या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबरीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाची वाणवा अशी नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.

तर यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकार चालवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. केंद्राचं अजिबात पाठबळ मिळत नाही. विकास करायला गेला तर खो घातला जात आहे. मेट्रो हे त्याचं उदाहरण आहेच, ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही, त्या ठिकाणी हीच परिस्थीत आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येऊन मोदींविरोधात मजबूत संघटन निर्माण करण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले. आता काही निवडणुका नाहीत. पण मोदींच्या विरोधात विरोधकांनी एकत्र आलंच पाहिजे. अनेक पक्ष भाजपच्या विरोधात निवडणूक लढून सत्तेत आले आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत. हे पक्ष यूपीएचा भाग नाहीत. त्या सर्वांनी यूपीएत आलं पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार येणार आणि ५ वर्ष चालणार!

News Desk

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk

धक्कादायक! बीडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

News Desk