HW News Marathi
महाराष्ट्र

‘लव जिहाद’ कायदा महाराष्ट्रात होणार का?’ संजय राऊत म्हणतात… 

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात लव जिहाद प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये लव जिहाद विरोधात कायदा केला जाणार असल्याची चर्चा असून, महाराष्ट्रातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. भाजपाच्या मागणीला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत आव्हान दिले आहे. “विकास हाच निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असतो. पण, लव जिहादचा मुद्दा समोर आला आहे. त्याचं स्वागत करतो. महाराष्ट्रात कायदा कधी होणार असं काही नेते म्हणत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा केला जाणार आहे.

राज्यातील काही भाजपचे जे प्रमुख नेते विचारत आहेत की, महाराष्ट्रात कायदा कधी होणार? माझी आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या विषयावर आम्ही इतकं सांगू की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कायदा होऊ द्या. पण, बिहारमध्ये नितीश कुमार जेव्हा लव जिहादचा कायदा आणतील. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू. त्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणण्याविषयी विचार करू. बिहारमध्ये भाजपाचं सरकार आहे. नितीश कुमार भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. कारण सर्वात जास्त जागा भाजपच्या आहेत. नितीश कुमार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचच आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“गेल्या काही दिवसांपासून देशात आणि महाराष्ट्रात लव्ह जिहाद विषयावर महाराष्ट्रातला विरोधी पक्ष, तसंच देशात जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे लव्ह जिहादसंबंधी कायदा करा अशी मागणी होत आहे. बहुधा पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हे होत आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा होतोय. महाराष्ट्रात करा असा हट्ट केला जात आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचं राहू दे…बिहारमध्ये नितीश कुमार जवळजवळ भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये सर्वात आधी कायदा करा. तिथे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जो कायदा बनवला जाईल त्याचा अभ्यास करु आणि नंतर महाराष्ट्रात विचार करु. राज्यात लव्ह जिहाद नव्हे, तर करोनाचं संकट मोठं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अर्थव्यवस्था सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बेरोजगारी, महागाई या मुद्यांपेक्षा मोठा लव जिहाद असेल, तर आधी बिहारमध्ये कायदा होऊ द्या. अभ्यास करून महाराष्ट्रात कायदा करण्याचा विचार करू. पंतप्रधानांचं म्हणणं भाजपा नेत्यांना समजत नाहीये. दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर संकट असल्याचं पंतप्रधान सांगत आहेत. पण, महाराष्ट्रात भाजपाचेच नेते पंतप्रधानांचंच ऐकत नाहीयेत. उलट आंदोलन करत आहेत. रस्त्यावर उतरत आहे, जसं काही हे करोनाचेच बाप आहेत,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारचं डोकं सरकलय की काय ? निलेश राणेंचा पुन्हा एकदा राज्य सरकारवर प्रहार

News Desk

आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही! – संजय राऊत

News Desk

‘बारावीच्या निकालाआधी वर्षा गायकवाड म्हणाल्या’….!

News Desk