HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे – संजय राऊत

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज (२७ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत केंद्र सरकारला घाबरायचे की विरोधात लढायचे हे ठरवा असे सांगितले होते.महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे अशी तडक प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

“उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरे असे कधीच नसते. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना बिगरभाजप राज्यांना आवाहन केलं आहे. या सगळ्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर करावं असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.“महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे. शरद पवार हे काम करत आहेत पण त्यांच्यासोबत सर्वांनीच केलं पाहिजे,” असेही यावेळी ते म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी जीम, मंदिरं यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कालच देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे चार, तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी होते. उद्धव ठाकरे यांना कॅबिनेटची बैठक घ्यायची होती, त्यामुळे सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना सांगितलं की आधी उद्धव यांना बोलू द्या. त्यावर उद्धव ठाकरे ममता दीदींना म्हणाले ‘इजाजत है क्या दीदी?’ त्यावर ममता यांनी “उद्धवजी, आप बहुत अच्छा फाईट कर रहे है” अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं” असे अभिमानाने सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणावर अन्याय करणाऱ्यांची राख करु

News Desk

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”, तुषार भोसलेंची ठाकरे सरकारवर टीका

News Desk

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Aprna