HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीपेक्षा पूरग्रस्तांना लवकरच मदत देण्यात आली, राऊतांचा विरोधकांना टोला

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमीच आपल्या टीकात्मक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. या वर्षी पावसाने थैमान घालून राज्यात पूर परिस्थिती निर्माण केली आहे. पूरग्रस्तांना सरकारकडून मदत देखील जाहीर झाली आहे. मागच्यावेळी सांगलीत पूर आला होता. त्याच्यापेक्षा पूरग्रस्तांना आता लवकर मदत मिळाली आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. नैसर्गिक संकट असलं तरी सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. नियंत्रण ठेवणं सरकारचं काम आहे. ते काम सरकार करत आहे.

विरोधकांना टोला

संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पूरग्रस्ताना मदत उशिरा पोहचली असा आरोप केला जातोय. उशिरा म्हणजे काय? लवकर म्हणजे काय? हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही. सांगलीपेक्षा लवकरच मदत देण्यात आली आहे, असं राऊत म्हणाले आहेत. राज्यात ढगफुटी झाली. मुख्यमंत्री मंत्रालयात होते. नियंत्रण कक्षात बसून सगळ्या गोष्टींवर त्यांचे लक्ष होते. या घटनेमुळे मुख्यमंत्री दु:खी होते. केंद्राच्या संपर्कात राहून त्यांना माहिती देत होते. मागच्या वर्षीपेक्षा जलदगतीने काम करत होते. पूरग्रस्तांना मदत मिळते की नाही यावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री चिपळूणला रवाना

चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक घरं उध्वस्त होऊन लोकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२४ जुलै) महाडच्या तळीये गावाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून आज (२५ जुलै) ते चिपळूणला जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे चिपळूणला जाणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून सांगितलं आहे. गुहागरमधून ते चिपळूणकडे रवाना झाले आहेत. नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करणार आहेत.

नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस चिपळूणला रवाना

कोकणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक लोकांना आपले प्राण गमावले आहेत . दर्दी कोसळून कित्येकांची घरं उध्वस्त आहेत. कोकणातले नेते जे आता केंद्रीय मंत्री आहेत ते नारायण राणे आता पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत, अशी माहिती त्यांनी आपली ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळाचं आदिवेशन सुरु आहे. नारायण राणे हे दिल्लीहून कोकणात रवाना झाल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट द्वारे सांगितलं आहे. ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या निवेदनातील महत्वाचे मुद्दे

News Desk

राजा उदार झाला, हाती भोपळा आला – देवेंद्र फडणवीस

News Desk

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन’

News Desk