HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुंबई, महाराष्ट्रानं अनेक लोकांना धनवान केलंय’, राऊतांचा विरोधकांना टोला

मुंबई | शिवेसनेचे नेते संजय राऊत हे त्यांच्या बेधडक आणि बिंदास स्वभावाची ओळखले जातात. ते सामनातून नेहमीच आपला स्पष्ट मत व्यक्त करत असतात. ‘मुंबई आणि महाराष्ट्रानं अनेकांना धनिक केलं आहे. श्रीमंत केलं आहे. श्रीमंतांच्या जागतिक यादीत मुंबईतील अनेक जण आहेत. राज्यातील पुराच्या संकटात त्यांना आता मनाची दिलदारी दाखवावी लागेल,’ अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारसोबत इतर हातही पुढं यायला हवेत

राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकार मदत करत आहेत, पण केंद्राकडून सुद्धा मदत मिळाली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केला आहे. ‘अतिवृष्टी आणि पुराच्या रूपानं महाराष्ट्रावर मोठं संकट कोसळलं आहे. राज्य सरकारनं परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य सरकारसोबत इतर हातही पुढं यायला हवेत. महाराष्ट्राला सहस्त्र हातांनी मदत मिळण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं मदतीचा हात पुढं करणं गरजेचं आहे. आताही ते मदत करताहेत. चांगली मदत करताहेत. पण त्याशिवाय, मुंबई, महाराष्ट्रानं अनेकांना धनिक केलं आहे. श्रीमंत केलं आहे. श्रीमंतांच्या जागतिक यादीत मुंबईतील अनेक जण आहेत. त्यांनी आता मनाची दिलदारी दाखवण्याची गरज आहे,’ असं राऊत म्हणाले आहेत.

भास्कर जाधव यांना मी ओळखत नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल(२५ जुलै) चिपळूण दौरा केला. दरम्यान दुकानदारांशी बोलताना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या अरेरावीचा विडिओ समोर आला आहे. प्रत्येक घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणात मात्र संयमी प्रतिक्रिया दिली. “भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही, वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काय बोले भास्कर जाधव?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल(२५ जुलै) चिपळूणच्या बाजारपेठेची पाहणी करत असताना एक महिलेने त्यांच्या पुढ्यात तिची व्यथा मांडली. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं…राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप  

News Desk

नवाब मलिकांना पुन्हा धक्का! 18 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

Aprna

“ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि…”, ऊर्जामंत्र्यांचं आवाहन

News Desk