HW News Marathi
महाराष्ट्र

टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न, पीएचडी तर काहींना डीलिट दिली पाहिजे!

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत कायम भाजपवर अनेक विषयांवरुन टीका करत असतातच. आताही त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी करत भाजपची अक्षरश: पिसे काढली. कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे, असा चिमटा काढतानाच आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी टीका करतानाच आगामी काळात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत असतात. टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. भाजपमधील काही लोकांना पीएचडी तर काहींना डीलिट दिली पाहिजे, असा टोमणाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी ते असंही म्हणाले की, त्यांना म्हणजेच भाजपला लोकं मारायची आहेत. मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, असं ते म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले कित्येक महिने परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे परदेशात कोरोनाची काय स्थिती आहे हे भाजपवाल्यांना कळणार नाही. जरा परदेशात काय चाललं ते पाहा. ब्रिटनमधून होणारी विमानसेवा ४२ देशांनी बंद केली आहे. कशासाठी केली आहे? काही कळतं का भाजपला? असा सवालही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरेंचा प्रवास !

News Desk

गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

“मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन”, संदीप देशपांडेंचा टोला

News Desk