HW News Marathi
महाराष्ट्र

“…म्हणून राऊतांना जेवण पचत नाही”, फडणवीसांचा राऊतांवर निशाणा

चंद्रपूर | विरोधकांकडून ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मूळ गावी मूल येथे आज (२ जूलै) आले होते. कार्यक्रम संपवून परत जाताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर घडविले जात आहे, असा आरोप होतो आहे. या आरोपात कितपत तथ्य आहे? असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आळा. यावर ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राऊतांना जेवणच पचत नाही, फडणवीसांचा टोला

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच, राज्य सरकारने इम्पिरीकल डेटा गोळा करण्याचे काम ओबीसी आयोगाला दिलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संबंधाने राज्याची याचिका कायम असून हा प्रश्न मागासवर्ग आयोगाकडे द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही कारण महाराष्ट्राला त्यांची गरज! – संजय राऊत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते (२८ जून) मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन दिलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नेते संजय राठोड आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

News Desk

शेतकरी कन्यांचे पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

News Desk

जितेंद्र आव्हाड यांनी ‘या’ कारणामुळे स्वत:ला केले क्वारंटाइन

News Desk