HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी सरकार पाडण्याची तारीख ठरवली असेल तर त्या तारखेला आमच्या शुभेच्छा!

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो. त्यामुळे फडणवीसांना आमच्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आहे. इतकंच नाही तर काल पंढरपूरात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सरकार कधी पाडायचं ते माझ्यावर सोडा. या त्यांच्या वक्तव्याचाही राऊतांनी समाचार घेतला आहे. फडणवीसांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख ठरवली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि आमचे वैयक्तिक वाद नाहीत. आमचं राजकारणातील युद्ध आम्ही लढूच. त्यामुळे त्यांना गुढी पाडव्याच्या आमच्या शुभेच्छा आहेच. सरकार पाडण्यासाठी त्यांनी एखादी तारीख मुकर्रर केली असेल त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा चिमटा राऊत यांनी काढला. आज (१३ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी तो बोलत होते.

पश्चिम बंगालचे शिखंडी कोण? राऊतांचा सवाल

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी लादण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला. महाभारताचंही युद्ध लढलं गेलं. त्यावेळी शिखंडीला पुढे करून युद्ध लढलं गेलं. पश्चिम बंगालमध्येही युद्ध सुरू आहे. पण पश्चिम बंगालचे शिखंडी कोण आहेत? त्याचा शोध घेतला पाहिजे. कोणत्या शिखंडींना पुढे करून बंगालमधील युद्ध लढलं जातंय हे पाहावं लागेल, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच ममता दीदींनी नियमभंग केला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण इतरांनी नियमभंग केलाच नाही का? सर्व काही अलबेल आहे का? की दीदींसाठी काही नियम वेगळे आहेत?, असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू शकतो – संजय राऊत

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती तशी नियंत्रणात आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले. देशभरात कोरोना वाढत आहे. लोक कसेही वागत आहेत. लोकांनी नियम पाळले नाही तर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू शकतो, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागला तरी आश्चर्य व्यक्त करायला नको असंही पुढे म्हणायला ते विसरले नाही. दरम्यान, उद्या (१४ एप्रिल) संजय राऊत बेळगाव लोकसभा निवडणूकीसाठी

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपुरातील सभेतून राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिला होता. त्यामुळे पंढरपूरातील या निवडणूकीत राष्ट्रवादी बाजी मारणार की भाजप हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. संजय राऊत १४ एप्रिलला सकाळी बेळगावात दाखल होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रीज जवळ असलेल्या मराठा मंदिर हॉलमध्ये राऊत जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

“बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समीतीचे उमेदवार शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेनेचा त्यांना पाठिंबा आहे. मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी १४तारखेला बेळगावला पोहोचत आहे.” असं लिहित संजय राऊत यांनी उमेदवाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातच्या पटेलचा शिवसेनेला ‘हार्दिक’ पाठिंबा

News Desk

“आधुनिक रँडला निवडणुकीत जनताच धडा शिकवेल”निर्बंधांवरुन संदीप देशपांडेंची मुख्यमंत्र्यावर टीका!

News Desk

‘फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार’ मोठ्या नेत्याने केलं विधान !

News Desk