HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

पणजी | फडणवीसांनी मला नटसम्राट म्हणून नटसम्राटची खिल्ली उडवून गोव्यातील रसिकांचा अपमान केला आहे. ते आम्हाला जरी नटसम्राट म्हणत असले तरी आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, तसेच चंद्रकांत पाटलांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया द्यायला ते काही टॉलस्टॉय नाहीत, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

याआधी देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर टीका करताना त्यांना नटसम्राटाची उपमा दिली होती. या पार्श्वभूमीवर राऊतांनी देखील आता फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले, “नटसम्राट हे महाराष्ट्रचं वैभव असून गोव्याला रंगभूमीची मोठी परंपरा आहे. याबद्दल त्यांना माहीत नाही. राज्यातील सर्व नटसम्राट गोव्यातून गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही तर गोव्याची भूमी आहे. त्यामुळे नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्याच्या रसिकजनांचा तसेच गोव्यातील कलाप्रेमींचा अपमान करत आहेत. आम्हाला आनंद आहे की त्यांनी आम्हाला नटसम्राट म्हटलं पण, शब्द फिरवणारे सोंगाडे आम्ही नक्कीच नाही”, असे राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ‘कुणी मला खुर्ची देता का खुर्ची अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्‍था झाली आहे’, अशा शब्‍दात फडणवीसांवर टीका केली.

फडणवीस काय म्हणाले होते?

संजय राऊत हे सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं बोलतात. त्यामुळे राऊतांना नटसम्राटाची भूमिका द्यायला पाहिजे. त्यांनी आधी नटसम्राटपणा थांबवावा, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर केली होती. तसेच “संजय राऊतांचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत. मनोहर पर्रीकर आजारी असताना ते काय बोलत होते?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्याला देखील आता संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. ”त्यावेळी पर्रीकर सक्रीय नव्हते म्हणून बोलत होतो. परंतु, त्यांचं काही दुर्दैवी व्हावं अशी आमची भूमिका नव्हती. आम्ही इतके निर्दयी नाहीत. आम्ही त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करत होतो. तसेच उत्पल पर्रीकरांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. पण, जर ते स्वतंत्र लढले तर आम्ही उमेदवार नाही, असंही राऊत म्हणाले.

आम्‍ही चंद्रकांत पाटलांकडे लक्ष देत नाही

महाविकास आघाडीत राहून शिवसेना हा पक्ष रसातळाला गेलाआहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, “चंद्रकांत पाटील म्हणजे टॉलस्टॉय नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ काढून आम्ही त्यावर बोलावं असं काही नाही. त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. आम्‍ही त्‍यांच्‍याकडे लक्ष देत नाही, तुम्ही लोकांना ऐकवत राहा. लोकांचं मनोरंजन होईल”, असं राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांचा बाप काढणारे आज अर्णब गोस्वामींना उपदेश करतायत !

News Desk

पुण्यातील कंपनीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करणार – अजित पवार

News Desk

संजय शिरसाट नाराज? ट्विट मध्ये उद्धव ठाकरेंचं उल्लेख

Seema Adhe