HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राऊत म्हणतात…

पुणे | राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारमधल्या एका मंत्र्याचे नाव या विषयाशी जोडले जात आहे. या बद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, “हा जो विषय आहे, तो फक्त राजकीय नाही. हा राजकीय, भावनिक विषय आहे, तसेच पोलिस तपास करीत आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करून तपासात दिशाभूल करणे किंवा अडथळे आणणे, असं आम्ही करणार नाही” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

राज्यातील सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे” असे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

करोनाचं कारण पुढे करून संसद होऊ दिली नाही. हे चंद्रकांत दादा विसरले का? हे देशावर नव्हे तर जगावर आलेल संकट आहे. ते निमित्त वैगरे नाही. ते संकटच आहे. पाच वर्ष सत्तेत राहिलेल्या चंद्रकांत दादा सारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे भाष्य करावे. हे दुर्दैव आहे आणि कशा करिता आम्ही घाबरत आहोत. आज ही १७० च बहुमत आमच्याकडे आहे. आम्ही सरकार स्थापन करताना देखील सांगितले होते. आम्हाला बहुमताची अजिबात चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती म्हणजे या संसर्गाची” असे राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनधन खातेदारांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून रूपै एटीएम कार्डचे 8 मे पासून वितरण

News Desk

शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत!- बाळासाहेब थोरात

News Desk

फडणवीसांनी संजय राऊतांना दिली नारदाची उपमा ! ‘एक नारद सर्व गारद’

News Desk