HW News Marathi
महाराष्ट्र

बुरा न मानो होली है… संजय राऊत यांचे सूचक ट्विट

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणानंतर भाजपने सत्ताधारी पक्षाला वेठीस धरून ठेवले. महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत जाऊनही या प्रकरणाची तक्रार करण्यात आली. दिल्लीत राहून सातत्याने पत्रकारपरिषदांच्या माध्यमातून भाजपचा हल्ला परतवून लावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक नवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी आपल्या अनोख्या स्टाईलचा वापर केला आहे. त्यांनी एक शेर ट्विट केला आहे. ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’, अशा मजकूर त्यामध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

सध्या फोन टॅपिंग आणि परमबीर सिंग यांच्या पत्रावरून संजय राऊत भाजपच्या आरोपांना तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावरून संजय राऊत महाविकासआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसशीही दोन हात करत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे वास्तवाकडे दुर्लक्ष करु नका, अशा आशयचा राऊतांचा हा संदेश नेमका कोणासाठी आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी ‘बुरा न मानो.. होली है………’ असं कॅप्शनही दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बीड जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट पालकमंत्री गप्प का?” विनायक मेटे

News Desk

गोपिचंद पडळकर म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ सुनिल शेळकेंनी घेतला खरपूस समाचार!

News Desk

पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री !

News Desk