HW News Marathi
महाराष्ट्र

सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

महाड | महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे महाडच्या सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महाड शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी शाळेत गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.

महाडमध्ये सकाळपासून पावसाचा जोर आहे. त्यामुळे सावित्री नदीला पूर आला असून समुद्राला ओहोटी लागल्यानंतर पुराचे पाणी ओसरेल, अशी माहिती प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या या मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीलादेखील बसला आहे. महाड-रायगड मार्गावरील महाडजवळच्या पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पूल पाण्याखाली गेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांची प्रकृती खालावली, उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल

Aprna

बुलडाण्यात बैलांची दुधाने आंघोळ घालत स्वाभिमानी संघटना आंदोलनात सहभागी

News Desk

वैभव पिचड यांची कार्यकर्त्यांसोबतची बैठक संपताच “जय श्री राम”च्या घोषणा

News Desk