HW News Marathi
महाराष्ट्र

‘सावित्रीजोती’ मालिका बंद न होण्यासाठी आता राजकीय वर्तृळातूनही प्रयत्न सुरु!

मुंबई | महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मालिका ‘सावित्रीजोती’ केवळ टीआरपी नसल्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चाही सुरु झाल्या. पण ही मालिका बंद होऊ नये म्हणून आता सर्व सामान्यांप्रमाणेच, राजकीय वर्तुळातूनही प्रयत्न व्हायला सुरुवात झाली आहे.राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालिका बंद न करण्याचं आवाहन केलं असून मालिकेच्या निर्मितीसाठी चित्रपटाप्रमाणे अनुदान देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती ही त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमूख यांना पत्राद्वारे केली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत पत्र लिहून मालिका सुरू ठेवण्याबाबत विनंती केली आहे.

ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी, ‘टीआरपी अभावी मालिका बंद होणार असतील तर या जॉनरच्या मालिका करण्याचं कोणी धाडस करेल का?’ असा सवाल उपस्थित केला होता. शिवाय ‘तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत ज्यांनी समाज घडवला, अशा इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचं महत्त्व आता कमी झाले आहे का?’, असाही सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर निर्माते महेश टिळेकरांनी याबाबत सोशल मीडियावर आपले विचार मांडत नाराजी व्यक्त केली होती.

याबाबत टिळेकर म्हणाले होते की, ‘फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं. त्यामुळे सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो’,असं त्यांनी म्हंटलं होतं. त्यामुळे नरके म्हणाल्याप्रमाणे खरचं इतिहासातील व्यक्तीमत्वांचं महत्व कमी झालं आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळेल का?

हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार!’

News Desk

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आता मनसेच्याही रडारवर

News Desk

आरक्षणाचा खेळखंडोबा भाजपाने मांडलाय – जयंत पाटील

News Desk