HW News Marathi
महाराष्ट्र

सेनेने बाळासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी महायुतीत यावे – रामदास आठवले

मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , भाजप व रिपाई एकत्रित आल्यास राजकिय दृष्ट्या मोठा फायदा होईल , व सेना, भाजप रिपाइंचे सरकार येईल असे प्रतिपादन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते खोपोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जुन्या पुतळ्याला वर्ष झाली तीस,मग मी का करु ऊद्धाटनाचा कार्यक्रम मिस, अशा काव्यपंक्ती उच्चारत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हसत हसत चिमटे काढले, आज ते नगर परिषद खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरण करण्यासाठी आले होते.

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होता कामा नये, आपल्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे मात्र दुरावा निर्माण होऊ नये, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखालील मी एकटा गेलो, मी मंत्री झालो, आंबेडकरी बाकी नेते मागे राहिले. असे सांगत आठवले पुढे म्हणाले की खोपोली ची माणसं मला आवडतात. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह या कार्यक्रमाला खोपोली मधून बसेस भरून आलेले खोपोली कर आहेत. आठवले पुढे म्हणाले की मी लोकसभा सभागृहात हसवता, हसवता कुणाला फसवतो हे त्यांना ही कळत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी भिम शक्ती शिव शक्ती एकत्र करण्याचे स्वप्न पाहिले होते त्याचा मी खरा साक्षीदार आहे, प्रबोधनकार ठाकरे व बाबासाहेब आंबेडकर मित्र होते. आपण ही मित्र असले पाहिजे असं मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांना उद्देशून केले. सध्या सामाजिक सुधारणा झाली आहे.

बाबासाहेबांचा पुतळा फारच सुंदर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सुशोभीकरण या ठिकाणी झाले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की भारतीय संविधानाच्या पलीकडे जाऊन कोणालाही काम करता येत नाही, देशाच्या हितासाठी या देशाच्या कल्याणासाठी डॉ. बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे.तर मागासवर्गीय समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि समाजाला दिशा दाखवण्याचं काम सामाजिक न्यायमंत्र्यांच्या माध्यमातून आठवले करीत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य कित्येक वर्षानंतर आज सुद्धा पिढ्यानपिढ्या पुढे नेले जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य फक्त या देशात मर्यादित नव्हे तर संपूर्ण जगाला हेवा वाटावा असेच आहे. तर ज्या पद्धतीने संपूर्ण जगामध्ये सर्वात स जास्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत ,जगामध्ये सर्वात उत्तम लोकशाही म्हणून या भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत. तर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी या मतदारसंघात सर्व मतभेद बाजूला ठेवून विकास कामे केली जात असल्याचे सांगत

५० लाखाचा निधी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर, सुशोभीकरणासाठी आमदार फंडातून देत असल्याचे सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष सुमन औसरमल, उप विनीता कांबळे, माजी आमदार सुरेश लाड, जगदीश गायकवाड, दत्ताजी मसुरकर, धर्मानंद गायकवाड नरेंद्र गायकवाड व मान्यवर उपस्थित होते।

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश असावा! – उपमुख्यमंत्री

Aprna

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!, भाजपचा टोला

News Desk

नवाब मलिकांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk