HW News Marathi
महाराष्ट्र

आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय, शरद पवारांकडून कानपिचक्या

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने आज संघर्ष दिसत आहे. एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागतायेत त्यांच्यावर दिलगिरी ही व्यक्त करण्याची वेळ येते. महाराष्ट्रातील ही आजची परिस्थिती आहे.किसनराव बाणखेले विरोधात असताना देखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसते, असं शरद पवार म्हणाले. मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.

सध्या एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील सह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी सध्याच्या राजकारण्यांच्या कान टोचले. सध्या एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय आणि दिलगिरी व्यक्त करण्याची दुर्दैवी वेळ येते, अशा शब्दात शरद पवारांनी राजकीय नेत्यांना कान पिचक्या दिल्या आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत आणि शरद पवार यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीच सरकार आलं. मुख्यमंत्री स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार होते. पण त्यांना बैठक लागली. त्यांनी खासदार राऊतांकडे निरोप दिलेला आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते पाटलांवर शेलक्या शब्दात समाचार घेतला होता. संजय राऊत यांनी भाषण सुरू केले असता प्रमुख मान्यवरांची नावे घेत असताना खेड विधानसभा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा नाव घेताच उपस्थिता मध्ये एकच हशा पिकाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आता पुन्हा राज्य कसे काय गहाण टाकणार ? | अशोक चव्हाण

Gauri Tilekar

बीड जिल्हा कचेरीच्या आवारातील रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार

News Desk

कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता!  

News Desk