HW News Marathi
महाराष्ट्र

‘मराठा आरक्षणासाठी मुंबईत होतो’ म्हणुन कृषी विधेयक मंजूरीदरम्यान राज्यसभेत गेलो नाही – शरद पवार

मुंबई| गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलली कृषी विधेयकं राज्यसभेत नुकतीच मंजूर करण्यात आली.ही विधेयकं मंजूर करण्यासाठी भाजप आग्रही होतं तर दुसरीकडे काँग्रेसने कडाडून विरोध केला.मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त करण्यात आली.स्वत: शरद पवार राज्यसभेत उपस्थित नव्हेत त्यावर आता पत्रकार परिषदेत पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारने सुप्रिम कोर्टात अर्ज केला आहे आणि त्यासंबंधी गेले २ दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच कायद्याचा आधार घेत विचार सुरू असल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात महत्वाचा असल्यामुळे काल मी दिल्लीला गेलो नाही असेही ते म्हणाले.त्यामुळे राज्यातील आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असल्याने आपण दिल्लीत कृषी विधेयकादरम्यान उपस्थित नसल्याचं सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवली

News Desk

कम बॅक राहुलजी, बाळासाहेब थोरात यांनी लिहिले राहुल गांधींना पत्र

News Desk

‘आप’च्या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही! – प्रविण दरेकर

Aprna