HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंना त्यांच्या कष्टाची नोंद घेतली नाही असं वाटतं असेल तर… शरद पवारांची खडसेंवर प्रतिक्रिया  

तुळजापुर | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. लवकरच एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (१९ ऑक्टोबर) तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकनाथ खडसेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

“एकनाथ खडसे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते होते, अर्थमंत्री होते. आम्हाला शिव्या घालत होते, पण त्यांचं कर्तृत्व, काम आणि खानदेशातील स्थान याकडे दुर्लक्ष करता येणार नाही” असे शरद पवार म्हणाले.खडसेंना त्यांच्या कष्टाची नोंद घेतली नाही असं वाटतं असेल, तर त्यावेळी कुठं तरी माणूस, जिथं नोंद घेतली जाते तिथे जावं असा विचार करतो. आता एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर त्याला आम्ही काय करावं?, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे. खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे असेही शरद पवार म्हणाले आहेत.

पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

– कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला. इतर मंत्री फिल्डवर होते, आम्ही दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करत आहेत.

– विधानसभेत जाऊन 53 वर्ष झाली, मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. संकटात मी बसू शकत नाही, माझ्या हातात प्रशासनाची जबाबदारी नाही.

– संकटातून बाहेर काढण्यासाठी नियम बदलणे गरजेचं आहे. नेत्यांच्या दौऱ्याचा पूर सुरू झाला अशी टीका होते. मात्र, याकडे पॉझिटिव्ह पाहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे मागे उभे राहिले पाहिजे.

– पीक विमा ऑनलाईनला शिथिलता द्यावी. पीक विमा भरण्याच्या प्रमाणात वाढ करायला हवी. निकषांच्यानुसार फोटो अपलोड करणे शक्य नाही, मी स्वतः फोटो अपलोड करु शकत नाही.

– नदी ओढयाकाठी असलेल्या विहिरी, मोटारी वाहून गेल्या. जनावरे वाहून गेली, घरांचे नुकसान झाले. पण मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही.

– सध्या राज्यावर मोठे आर्थिक संकट, कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शक्य तितकं जास्त कर्ज घ्यावं अशी विनंती करणार

– उस्मानाबाद, नांदेड, लातूर, पंढरपूर, इंदापूर या भागात मोठं नुकसान, उस्मानाबाद हा पूर्ण जिल्हा संकटात

– शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली. काही जिल्ह्यांत नुकसानीची टक्केवारी जास्त

– राजकारणात मतभेद असतात. निवडणुकीमध्ये एकमेकांची काळजी घेतो. मात्र, संकटात सोबत असतो. केंद्र मदत करेल. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याचे ऐकलं ते सकारात्मक असतील.

– शासकीय वेतन देण्यासाठी 12 हजार कोटी दरमहा कर्ज घ्यावे लागले. राज्याला अशी वेळ का आली?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळ यांची माहिती!

News Desk

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

“फक्त अधिकार देऊन फायदा होणार नाही, तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढावी लागेल” – उद्धव ठाकरे

News Desk