HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांची त्या पत्रावरून शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंदिरे पुन्हा खुली करण्यासाठी लिहीलेल्या पत्राची आणि त्यात मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न विचारला होता, त्याचीच दिवसभर चर्चा होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रत्युत्तरही दिले होते. यावरुन भाजपकडून कडाडून विरोध केला आहे. आणि या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करुन राज्यापलांच्या या वादग्रस्त पत्राबद्दल पंतप्रधानांनाच पत्र लिहिल्याची माहिती दिली आहे.

‘माध्यमांद्वारे मला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रा बाबत माहिती मिळाली. राज्यपाल मुख्यमंत्र्यांनी धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करावीत अशी मागणी केली आहे. मी या पत्राबाबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील घसरलेल्या भाषेकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.

आपल्या घटनेच्या प्रस्तावनेतच सेक्युलर हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे सर्व धर्म समान असल्याची ग्वाही मिळते. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला या घटनेच्या या तत्वानुसार वागणे आवश्यक आहे.’ असे म्हणत राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर शरद पवारांनी नाराज असल्याचे संकेत दिले आहे. याचबरोबर त्यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रातील भाषा ही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने लिहिल्यासारखी आहे अशी टीकाही केली आहे.

दरम्यान या आधीही शरद पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची तक्रार केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिग्गज नेते आणि खासदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती. राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात.

राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असं मत त्यांनी मांडले होते. आथा पुन्हा एकदा पंतप्रधानांकडे राज्यपालांची शरद पवारांकडून तक्रार गेल्याने पंतप्रधान काय पाऊल उचलणारहे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धर्माबादच्या प्रवाशांनी मांडल्या डीआरएम जैन यांच्याकडे रेल्वेच्या समस्या

News Desk

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज, 1,367 कोटींची तरतूद!

News Desk

नांदेड महापालिकेत काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल 

News Desk