HW News Marathi
देश / विदेश

शरद पवार योग्य निर्णय घेतील पण मंत्र्यांनी पाय जमिनीवर ठेवण्याची गरज !

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांच्या पत्रामुळे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. सरकारवर भ्रष्ट म्हणून टिका होत आहे. या सगळ्यावर महाविकासआघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असा खरमरीत सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्र्यांना दिला आहे. .

यावर बोलत असताना संजय राऊत यांनी अनेक मुद्दयांवर स्पष्ट मतं मांडली. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

‘या’ प्रकरणात शरद पवार योग्य निर्णय घेतील !

या सगळ्या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन, असे राऊत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाॅकडाऊन मोडल्याप्रकरणी मंत्र्यांच्या मुलाशी हुज्जत घालणाऱ्या गुजरातच्या सुनिता यादवची बदली…!

News Desk

पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण | सुब्रमण्यम स्वामी

News Desk

शबरीमाला मंदिर परिसरात जमाव बंदी लागू

News Desk