HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या भाषणात शरद पवारांचा प्रभाव | आशिष शेलार

मुंबई | पूर्वी राज ठाकरे यांच्या भाषणात बाळासाहेबांचा प्रभाव दिसत होता. पण, आता त्यांच्या भाषणात शरद पवारांचा प्रभाव दिसत असल्याचे भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याच्या एक दिवस आधी शरद पवारांच्या मुंबई येथील निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीत नेमके काय झाले, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर ही सदिच्छा भेट असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

तसेच विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, उरलेसुरलेले नगरसेवक पळून गेले असे प्रत्युत्तर भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात ठाकरे यांनी‘मोदीमुक्त’ भारत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन ठाकरे यांनी केले होते.

“भारताला १९४७मध्ये पहिले स्वातंत्र्य मिळाले, १९७७ साली आणीबाणीतून दुसऱ्यांदा स्वायंत्र्य मिळाले, तर २०१९मध्ये भारताला मोदी मुक्त करा” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत म्हटले आहे. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

तसेच राम मंदिराची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. येत्या २०१९च्या निवडणुकासमोर ठेवूनच यांची सुनावणी पुढे ढकली जात आहे. निवडणुकीच्या काळात राम मंदिरावर निकाल आला की, त्याच महिन्यातच धार्मिक दंगली घडतील असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकार मशिदसाठी ट्रस्ट का उभारु शकत नाही?

swarit

इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन रद्द होताच केला जल्लोष, कोरोनाचे मोडले नियम

News Desk

महाराष्ट्रात पहाटेची ॲापरेशन फसल्यानंतर सप्टेंबर महिन्यात ॲापरेशन कमळचा मुहुर्त भोंदू डाॅक्टरांनी दिलाय !

News Desk