HW News Marathi
महाराष्ट्र

‘मदत कार्यात अडथळे येतील म्हणून पूरग्रस्तांच्या मदतीला येणं टाळलं’, शर्मिला ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई | राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचा मनोगत आता व्यक्त केलं आहे. तसंच पूर आल्याच्या पहिल्याच दिवशी मला तिथे जाऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा होती. पण ते का शक्य झालं नाही, याचा उलगडा त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी आधी पूरग्रस्तांना मदत पोहोचवावी असं सांगितलं होतं. पूर आल्या त्याच दिवशी राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबियांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाण्याचं टाळलं, म्हणून मी उशिरा येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मनसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कायम उभी

पुरग्रस्थ भागात अनेक राजकारण्यांनी पाहणी केली आहे आणि मदत देखील जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला का जाऊ शकले नाही याचं कारण आता त्यांनी स्पष्ट केलं आहे. मला पहिल्याच दिवशी पूरग्रस्त भागाला भेट द्यायची इच्छा होती. आपण त्या ठिकाणी भेट दिल्यास तिकडे सुरू असलेल्या मदत कार्यात काही अडथळे आले असते. त्यामुळे तेव्हा येणं टाळल्याचं त्या म्हणाल्या आणि म्हणूनच राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्त भागात जाणं टाळलं, असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं. मनसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कायम उभी असल्याचंही शर्मिला ठाकरेंनी नमूद केलं आहे.

पूरग्रस्तांसाठी मनसेकडून मदत सुरू असून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक मनसेकडून पाठवण्यात आल्याचं मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं. या महापूरात लोकांच्या बँकेच्या कागदपत्रांपासून ते घरातील सर्व सामान वाहून गेलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आम्ही पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून पाठवत आहोत. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसेचे अनेक ट्रक मदत घेऊन जाताहेत. मदत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते काम करत आहेत. मनसेची मदत पोहोचल्याचं तेखील पोलिसांनी फोन करुन सांगितलंच शर्मिला ठाकरे म्हणाल्यात आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्याअर्थाने तारणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प !

News Desk

कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढावी -अजित पवार

News Desk

श्रीकृष्णानंतर शिवाजी महाराज एकमेव दक्ष व्यक्तिमत्व – बाबासाहेब पुरंदरे

News Desk