HW News Marathi
महाराष्ट्र

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणी मुंबईत सेना-भाजपमध्ये जुंपणार?

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा निषेध व्यक्त शिवसैनिकांनी आज (१८ डिसेंबर) भाजपच्या मुंबई कार्यालयासमोर आंदोलन केले आहेत. कर्नाटकातील घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. ‘कर्नाटकात झालेली घटना ही छोटी गोष्ट आहे, असे वक्तव्य कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. यावेळी शिवसैनिकांकडून ‘कर्नाटक सरकार हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच शिवसैनिकांनी बसवराज बोम्मईविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाडुंरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या घटनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे. “कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावं, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कर्नाटकचे मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले

बंगळुरुमध्ये काल (१७ डिसेंबर) रात्री जी घटना घडली त्यांचा मी निषेध करतोय.  अशा छोट्या घटना ह्या होतच असतात, म्हणून  सरकारी वाहन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे चांगली नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचणाऱ्यांवर कठोर करावाई करण्यात येण्याचे आदेश गृहमंत्र्यांना दिली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणारे हे देशभक्तांचे काम नव्हे. तसेच महापुरुषांचे पुतळे हे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उभारले असतात, असे ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

४ खासदार निवडून येतात त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणायचं? पडळकरांचा सवाल

News Desk

केंद्र सरकारनंतर आता राज्यानेही पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर केला कमी

News Desk

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष!– डॉ. तानाजी सावंत

Aprna