HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : “शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असून ती आता सुलेमानी सेना झाली”, रवी राणांची टीका

मुंबई | “शिवसेना हिंदुत्वापासून पूर्णपणे दूर गेली असून ती आता शिवसेनाही सुलेमानी सेना झालेली आहे,” अशी टीका आमदार रवी राणा यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राणा दाम्पत्यानी एच. डब्ल्यू. मराठीला खास मुलाखतीत शिवसेनेच्या हिंदुत्व, बीएमसीने त्यांच्या घराला पाठविलेली नोटीस आणि राजद्रोहा गुन्हाचा आदी मुद्यांवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणा दाम्पत्यांनी आज (११ मे) पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र केला आहे.

शिवसेना यापूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आक्रमक होती, आताची परिस्थिती बदलेली, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी आमदार रवी राणा केल्याव ते म्हणाले, “ज्याप्रमाणे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसाला विरोध करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतात. एका महिलेला तुरुंगात पाठवितात आणि यानंतर त्या महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागते, अशी परिस्थिती एका महिला खासदारासोबत होते. त्यावरून लक्ष्यात येते की, शिवसेना हिंदुत्वापासून पूर्णपणे दूर गेलेली असून आणि आता शिवसेनाही सुलेमानी सेना झालेली आहे.” 

 रवी राणा म्हणाले, “महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा पठणावर जो राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावरून हे सिद्ध होते की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बद्धी मिळावी आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात फिरायला पाहिजे. मंत्रालय ज्यायाला पाहिजे. महाराष्ट्रातील जनता आज त्रास्त असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना न्याया द्यावा. आणि हनुमान चालिसा आणि हनुमानची आरती करून आम्ही दिल्लीमध्ये महाराष्ट्रच्या सुख आणि शांतीसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. राज्यात १४ मे रोजी मुख्यमंत्र्यांची जी सभा आहे. यासभेत नवनीत राणा यांनी जे आव्हान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही मतदारसंघातून लढायला पाहिजे. आणि तेथे लढून सिद्ध केले पाहिजे की जनमताने निवडून मुख्यमंत्री झाले पाहिजे,” दिल्लीमध्ये १४ मे रोजी हनुमान चालिसा पठण करणार आहे, ही महाआरती महाराष्ट्रात नाही दिल्लीत का?, या प्रश्नावर त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना उत्तर दिले.

बीएमसीने तुमच्या घरावर नोटीस पाठविले आहे, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी विचारल्यावर रवी राणा म्हणाले, “आम्ही बीएमसीच्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देणार आहोत. आम्ही तयार आहोत. आणि कायदेशीर न्याय मागणार आहोत.” येत्या काळातील निवडणुका हा भाजपच्या वतीने नवनीत राणा लढणार का?, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “असे काही आम्ही मोदींसोबत आणि राज्यात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहोत. पूर्ण ताकतीने त्यांची सात देणार आहोत.”     

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्युत वाहिनीवर टॉवर पडल्याने वीजपुरवठा खंडित

News Desk

परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी

News Desk